कठीण परिस्थितीत बेलोरा नायगाव खाणीचे कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण- महाप्रबंधक आबासचंद्र सिंह
- *कामगारांना खाणीत नव्या सुविधा उपलब्ध करून देणार*!
घुग्घुस: – अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या वेकोली वणी क्षेत्रातील बेलोरा नायगाव कोळसा खाणीचे उद्दिष्ट कोणत्याही अपघाता शिवाय उद्दिष्ट वेळेच्या चार दिवस आधीच पूर्ण करण्यात आले असून हे सर्व अधिकारी व कामगारांच्या अपार कष्टातून साध्य झाले असल्याचे मत महाप्रबंधक आबासचंद्र सिंह यांनी व्यक्त केले.
बेलोरा नायगाव खाणीतील कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल एक कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाप्रबंधक आबासचंद्र सिंह, जीएम ऑपरेशन एम संजीव रेड्डी, एस मोहंती एम. एस. नाथन, ब्रिनेज कुमार, देवराजन , उपशेत्रीय प्रबंधक संजय मिश्रा, खान प्रबंधक प्रताप सिंह पवार, राजकुमार, सुरेश सिंग गौर, अनिल बोरडे आदी मान्यवर मंडळीची उपस्थिती होती.
यावेळी नव्याने खान परिसरात उभारण्यात आलेल्या चेक पोस्ट व मोबाईल टॉवरचे उद्घाटन महाप्रबंधक आबास चंद्रसिंह यांचे शुभहस्ते करण्यात आले. सन 2023- 24 साठी या खाणीला 12.5 लक्ष टन उत्पादनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते हे सर्व उद्दिष्ट नियोजित वेळेच्या चार दिवस आधी शंभर टक्के करण्यात आले, डिस्पॅचचे बारा लक्ष टनाचे उद्दिष्ट होते ते 15.9 इतके अधिकचे करण्यात आले .ओबी काढण्याचे 75 लक्ष घनमीटर चे उद्दिष्ट होते ते 76.42 लक्ष घनमीटर इतके अतिरिक्त साध्य करण्यात आले. आर्थिक टक्केवारी 182.80 करोड देण्यात आली होती ती 225.26 करोड करण्यात यश मिळाले. हा सर्व उत्पादनाचा दर्जा 85 टक्के राखण्याचे उद्दिष्ट होते ते 95% वर नेण्यात यश मिळाले हे सर्व उद्दिष्ट साध्य करताना खाणीत एकही अपघात झाला नाही हे यात महत्त्वाचे ठरले असून सदर यश हे आबास चंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनात, उप क्षेत्रीय प्रबंधक संजय मिश्रा यांच्या नेतृत्वात तर खान प्रबंधक प्रताप सिंह पवार यांच्या अथक प्रयत्नाने साध्य करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी व कामगार नेत्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कामगारांच्या ग्रुपचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यात प्रथम क्रमांक रिले बी द्वितीय रिले ए तर तृतीय रिले सी या टीमचा समावेश होता. यावेळी नव्या आर्थिक वर्षात कामगारांना खान परिसरात वातानुकूलित विश्रामगृह, अद्यावत कार्यालय व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा आरो प्लांट या प्रकारच्या सुविधा कामगारांना लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महाप्रबंधक आभार चंद्रसिंह यांनी आपल्या मार्गदर्शनातून कामगारांना दिले.
सदर कार्यक्रमाला अधिकारी, कामगार प्रतिनिधी व कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाशदास यांनी तर उपस्थितयांचे आभार सुरक्षा अधिकारी अनिल बोरडे यांनी मानलेत. या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता संकेत खोकले, सुनील बिपटे ,अजित रासेकर ,निखिल दुर्गे, राजृ खोके, प्रशांत डोहे, विकास खापणे, सृष्टी यादव आदींनी अथक परिश्रम घेतलेत.